Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘लग्न’ Category

शिक्षण झाले, दोन-चार वर्ष नोकरी झाली, वय वर्ष २५-२६ओलांडले की नातेवाईकांकडून, ओळखीचांकडून लग्नासाठी विचारणा होवू लागते. इतर लोकच (आपले) ‘यंदा कर्तव्य आहे’ असे जाहीर करून टाकतात, घरचे देखील लगेच हो ला हो म्हणतात. घरच्यांचेदेखील प्रयत्न चालू होतात. काळ बदलला तसा घरच्यांकडून देखील कशी मुलगी हवी हे विचारले जाते. अशा वेळेस आमच्यावेळेस नव्हतं बर का असं, वडिलांनी सांगितलं त्या मुलीशी केलं लग्न, मांडवातच पहिल्यांदा पाहिलं तुझ्या आईला, वगेरे सांगणारे जुन्या सिनेमातले ‘बाप’ आठवतात, आणि आपल्या वडिलांकडून विचारला गेलेल्या या प्रश्नाबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. 🙂
पण तरीही अचानक आलेल्या या बाउन्सरमुळे थोडा गोंधळच होतो. दिसायला सुंदर, चांगल्या घरातली, चांगल्या संस्कारांची, graduate वेगेरे नेहमीची (पेटेंट) उत्तरे देवून आपण बाउन्सर तात्पुरता का होईना चुकवतो. पण असे बाउन्सर आता वरचेवर येणार हे माहित झालेले असते.
यक्ष प्रश्न असतो तो म्हणजे “नोकरी करणारी” की “घरकाम करणारी”(हाउस वाईफ) करणारी मुलगी?.
लहानपणापासून आईला नेहमी घरीच पाहिलेले असते, त्यामुळे आईसारखीच घर सांभाळणारी हे उत्तर चटकन पुढे येते. पण लगेच पुण्यात राहण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची यादी पुढे येते. एकटे असतो तेव्हा मित्रांबरोबर रूम शेअर करून राहत असतो, लग्नानंतर मात्र वेगळा flat हवा. नवीन घ्यायचा म्हणाले तर EMI आला, भाड्याचा म्हटलं तर महिन्याचे भाडे आले. बर flat झाला मग तो मोकळा ठेवून कसा चालेल. फर्निचर, TV, फ्रीज, वाशिंग मशीन आले. नवीन (काय आणि जुनी काय) बायको म्हणजे तिची हौस-मौज आली. साड्या, ड्रेस, चपला, सुंदर दिसण्याचे साहित्य, (अनेक गरज नसलेल्या वस्तू), शोप्पिंग, सिनेमा, नाटक, बाहेरचे जेवण, traveling हे ना  ते शंभर शे साठ खर्च आले. आता हे सगळे खर्च तराजूच्या एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात आपली salary ठेवली तर ते खर्चाचे पारडे धापकण खाली जाते. मग आपणच आपली समजूत काढतो, म्हणतो पूर्वीचा जमाना वेगळा होता. बाबांच्या पगारात घर आरामात चालायचे, पण आता तसे नाही. आपल्या पगारात आख्खे घर काय नुसता आपला आणि आपल्या बायकोच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा खर्च निघानेपण अवघड. आपल्याला तर नोकरी करणारीच बायको बरी.
असे आपले मत पक्के होते इतक्यात आपण flashback मध्ये जातो.
सकाळी आपण हंतरुणात लोळत असतो. सकाळी (लवकर?) उठायला गजराच्या घड्याळाची गरज लागत नाही. आईच उठवते. तोंड धुवून येतो तोवर समोर गरम गरम चहा तयार. अंघोळीसाठी पाणी काढून ठेवलेच असते. अंघोळ झाली कि नाश्ता तयार. कपडे धुवून इस्त्री करून ह्यान्गरला लटकत असतात, ते घातले कि निघालो बाहेर हुंदडायला. लहान पणापासून हीच सवय असते (बहुतेक जणांना). आणि लगेच आईचे ते शब्दही आठवतात, “अरे दादू स्वतःची कामे स्वतः करायला शीक, नंतर लग्न झाल्यावर बायको नाही करणार हो ही सगळी कामे.” पण लहानपणी आपणवेगळ्याच जगात असतो. तेव्हा आपल्याला नेहमी वाटते आई जशी बाबांची सगळी कामे करत आली आहे तशी आपली बायकोही करेल (असा होणाऱ्या बायकोविषयी गोड गैरसमज असतो).
flashback मधून आज मध्ये आल्यावर नोकरीवाल्या बायको वीषयी पुन्हा ना ना सवाल पुढे येवून थांबतात.
पुन्हा आता त्याच प्रश्नावर आपण आले असतो. “नोकरी करणारी” की “घर सांभाळणारी”?
नोकरी करणारी बायको उठवेल का आपल्याला सकाळी लवकर? चहा, आंघोळीचे पाणी, नाष्टा, इस्त्रीचे कपडे सगळं काही मिळेल का आयत तयार?
संध्याकाळी ऑफिस मधून थकून आल्यावर मिळेल का गरम गरम चहा आणि कांदा भाजी? (अधिक माहितीसाठी माझ्या या पोस्त मध्ये पहिला para पहा)
आईसारखे लज्जतदार खाणं बनवेल का ती? आईने जशी माझी, माझ्या बहिणींची काळजी घेतली, जे संस्कार आमच्यावर केले ते करेल का ती आमच्या मुलांवर?
‘मी नोकरी करते’ हा attitude (टेंभा) (सगळ्या मुलींमध्ये नाही पण काही… का बहुतेकीत :-)) असल्यास आपल्या घरातल्यांशी, नातेवाईकांशी आणि हो आपल्याशी जमवुन घेईल का ती ? आई बाबांना सांभाळेल का ती?
हे ना ते अनेक प्रश्न डोक्यावर तांडव घालतात.
पण थोडा विचार केला तर समजते बऱ्याच गोष्टी आता बदलल्या आहेत. पूर्वी घराची जबाबदारी आईवर आणि बाहेरची बाबांकडे असायची. अशी सरळ लक्ष्मणरेषाच होती. आई बाहेरच्या गोष्टीत लक्ष घालत नसे, आणि बाबाही घराच्या बाबतीत लुडबुड करत नसत. जवळपास प्रत्येक घरी हेच चित्र होते.

पण आता मात्र तसे नाही, काळ बदलला आहे. आज मी स्वतः माझ्या होणाऱ्या बायकोने बाहेर नोकरी करावी असे म्हणतो, मग साहजिकच मला तिच्याकडून आईने केलेल्या सगळ्या कामांची अपेक्षा करता येणार नाही. ती जर बाहेरच्या कामात लक्ष घालत असेल तर साहजिकच मला घराच्या कामात (जमेल तितके) लक्ष द्यावे लागेल. जशी ती घराची आर्थिक घडी बसवायला मला मदत करते तशी मला तिला घराची घडी बसवायला मदत करावी लागेल.
अन्यथा तिच्याकडून किती म्हणून अपेक्षा ठेवायची मी? बाहेर नोकरीपण कर आणि घरीची पण सगळी कामे कर. मला मस्त मस्त जेवण पण बनवून घाल, तोंडातून पडल्या पडल्या मला गोष्टी आणून दे. आणि मी काय करणार? नुसते हुकम सोडणार? ….याला काहीच अर्थ नाही.

थोडक्यात काय तर थोडी फार adjustment केली तर कुठे तरी गोष्टी सोप्या होतील असे वाटले. लग्नानंतर सुखी आयुष्याचा हाच मूलमंत्र आहे म्हणे.
हं आता ‘ती’चा देखील हाच दृष्टीकोन (attitude) असेल तर मग’च’ गोष्टी खरच सोप्या होतील.

पाहू काय होते ते?

Read Full Post »

रम्य संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही दिवसभरच्या ऑफिसच्या कटकटीतून, पुण्याच्या तंग रहदारीतून घरी येता. लोड शेडींग मुळे लाईट नाही, त्यामुळे लिफ्ट बंद. २-३ जिने चढून तुम्ही घराच्या दरवाजापर्यंत येता, दोनतीन वेळा घराची कडी वाजवता, आतून काही हालचाल नाही. मग रागावून जोराने दार ठोठावता, इतक्या जोरानेकी पलीकडचे जोशी बाहेर येतात आणि म्हणतात, “काय देशपांडे (असेच टोपण नाव हं), आज काय दार तोडायचा बेत आहे कि काय … हि हि हि” (हे शेवटचे नेहमीचेच असह्य होणारे हास्य हं). तुम्ही आलेला सगळा राग एक ते दहा पर्यंत आकडे म्हणत दाबून टाकता, पुन्हा दारावर आपटण्यासाठी उगारलेली मुठ थोडी सैल करत हलकीशी थाप मारता. इतक्यात आतून ‘सौ’ दार उघडतात. “दार उघडायला इतका उशीर लागतो का?” असे तुम्ही जरा वरच्या पट्टीतल्या आवाजात म्हणता, तोवर सौ आत गेल्या असतात. तुम्ही हातातली पिशवी (म्हणजे bag … पिशवी म्हणायला बरे नाही वाटत :-)) टाकता, शूज काढता आणि आत जाता. हात पाय धुवून बाहेर येवून बसता तोवर आतून ‘सौ’ हिंदी मालिकांमध्ये घालतात तशीच नवी कोरी, नव्या fashion ची साडी घालून अगदी नटून-थाटून बाहेर एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात कांद्याच्या भजीची थाळी घेवून येतात. तुमचा आलेला सगळा राग क्षणात गायब. तुम्ही आपलं उगीच खोटं खोटं, “अगं कशाला उगीच एवढं सगळं केलंस?” त्यावर सौ,”अहो दिवसभर तुम्ही दमून आल्यावर नको का बायकोने चहा आणि खायला काही द्यायला?”

…….. वाह. किती छान दृश आहे ना. तुम्ही देखील हरवून गेलात ना स्वप्न दुनियेत. पण थांबा जरा. तुमची बायको काम करत असेल किंवा तुम्हाला नोकरी करणारी मुलगी हवी असेल तर तुम्हाला अशी स्वप्ने बघण्याचा सुद्धा हक्क नाही, तुमच्यासाठी ते पाप आहे. त्यामुळे जर का नोकरी करणारी बायको असेल किंवा हवी असेल तर तिच्याकडून अशा काही वागणुकीची अपेक्षा ठेवू नका. अनेकवेळा तुमच्या पेक्षा तीच उशिरा येण्याची शक्यता असेल, आणि मग कदाचित तुम्हालाच चहा आणि कांद्याच्या भजीची थाळी घेवून यायची वेळ येईल. 🙂 (चहा ठीक आहे पण कांद्याची भाजी म्हणजे ……..)

त्यामुळे सगळ्या लग्न इच्छुक मुलानो आत्ता पासूनच जेवण, नाष्टा म्हणजेच एकूणच स्वयंपाक शिकायला सुरवात करा.

वेल थट्टा बाजूला ठेवा … पण खरच स्वतः बनवून खायची मजाच काही और आहे. भले ते थोडं खारट किंवा तिखट असो. पण खरच मजा येते जेवण बनवायला. सुरवातीला पदार्थ खारट वा तिखट व्हायची शक्यता जास्ती आहे पण नंतर मीठ आणि तिखटाचा अचूक अंदाज येईल. आणि काही दिवसातच अगदी चविस्त नाही पण खाण्यायोग्य जेवण नक्कीच बनवू शकाल. अहो खरच तसं फार सोप्प आहे हो जेवण बनवणं. या बायका उगाचच जेवण बनवा म्हणजे समजेल वगेरे ताणे मारत असतात आपणा पुरुषांना. हं ज्या बायका चविष्ट जेवण बनवतात म्हणजेच सुग्रण वर्गात बसतात त्यांना नक्कीच हा हक्क आहे. पण ठीक-ठाक जेवण ज्या बायका बनवतात त्यांच्याशी नक्कीच तुम्ही स्पर्धा करू शकता. ज्या मुली करियर, शिक्षणाचे नाव सांगून जेवण बनवता येत नाही म्हणून कारणे देतात त्यांच्याबद्दल मला खरच वाईट वाटते. अहो एखाद्याला जेवण देवून, त्याची भूक भागवणं यासारखे दुसरे पुण्य नाही. अहो म्हणतात ना नवऱ्याच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो :-), आणि या आजकालच्या (काही) मुलीना हा मार्गच माहित नाही.

खरच जेवण बनवणं (खाण्यायोग्य) तसं सोप्प आहे. अहो खरच. आता माझ्यासारख्या मुलाला (पुण्यात नोकरीसाठी येण्याआधी) स्वयंपाकघर म्हणजे एक ठिकाण जेथे (माझ्या सुग्रण आईकडून) तयार जेवण मिळते असेच वाटत होते, तो ‘मी’ आज विविध प्रकारच्या भाज्या, भात, खिचडी, पोहे, उप्पीट (पोळ्या आणि चपाती सोडून हं … अजून तिथवर मजल नाही गेली … ते माझ्या होणाऱ्या बायकोसाठीच राखून ठेवलंय :-)) वगेरे पदार्थ बनवू शकतो, तर जगातला कोणताही (आळशी :-)) मुलगा बनवू शकतो. अहो घरी आईला जेव्हा मी जेवण बनवतो हे कळलं, तेव्हा तिचा विश्वासच बसेना.

काही नाही आधी प्रत्येक मानसी ३ मुठी याप्रमाणे तांदूळ घ्या, त्यात तांदळाच्यावर निम्मे बोट बुडेल त्याच्या थोडे कमी इतके पाणी घाला, चवीप्रमाणे मीठ. आणि ठेवा शिजवायला. भाजी साठी भाजी आणि कांदा कापा. कढईत थोडे तेल तापवायला ठेवा त्यात मोहरी, जिरे मग लसून थोडावेळ ठेवा, मग कांदा थोडा लाल होवू पर्यंत, मग हळद, तिखट, गरम मसाला आणि नंतर तुमची भाजी, थोडं मीठ. सगळं अधून मधून हलवा. थोडावेळ शिजत ठेवा. झाली भाजी. (सगळी रेसेपी नाही लिहिली नाहीतर रेसिपी चा पोस्त झाला असता). भाजी कोणतीही असो सेम रेसेपी. 🙂

फ़क़्त तो कांदा कापायचा भाग जरा…… अवघड जातो. आधी जरा जास्तीच जायचा, पण कांद्याचे दोन भाग करून पाण्यात धुतल्यावर कापायला घेतले कि डोळ्यात पाणी कमी येते. अर्थात चिरण्याआधी कांद्यावर घातलेले पाणी is inversely proportional to कांदा चिरताना डोळ्यातून येणारे पाणी :-). मी असे ऐकलेले की, कांदा चिरताना त्याचे टरफल डोक्यावर ठेवले तर डोळ्यातून पाणी कमी येते :-). मी तसे करूनही पहिले पण काही उपयोग नाही झाला :-). मी तर एक व्यक्ती कांदा चिरताना हेलमेट घालतो असे ऐकले :-). पण कांदा चिरण्याचा एक फायदा म्हणजे डोळे धुवून निघतात. (बायको किंवा GF चा तेव्हा फोन आला तर श्वास घेताना नाकातून येणाऱ्या आवाजाने तिला किती miss करतोय देखील सांगता येते :-)).

लग्नाआधी मित्रांबरोबर रूमवर स्वतः जेवण बनवायचा आणखी एक फायदा म्हणजे जेवल्यानंतर भांडी घासायला लागत नाही, ती जबाबदारी इतर खाणारे उचलतात. रोज तर शक्य नाही पण अधून मधून, सुट्टीला रूम वर जेवण बनवायची मजा येते.

पण स्वतः जेवन बनवून खाताना जो आनंद, समाधान मिळते ते काही औरच. ते साधारण जेवण जेवताना इतकं बरं वाटत आणि तेव्हाच घराच्या आईच्या खाण्याची पण आठवण येते. आधी घराच्या जेवणाला, नावडत्या भाजीला कधीतरी ठेवलेल्या नावाची आठवण येते आणि वाईट वाटू जाते.

आणि हो मुलाला जेवण बनवायला येते म्हंटल्यावर लग्नाच्या बाजारात थोडी किंमत देखील वाढायची शक्यात आहे. 🙂

थोडक्यात काय तर घरकी मुर्गी मुर्गी (च) बराबर , जेव्हा ती स्वतः बनवलेली असते.

या लेखातून कोणाही स्त्रियांना दोष देण्याचा बिलकुल हेतू नाही. 🙂 infact ज्या सुग्रण स्त्रिया आहेत किंवा ज्या नोकरी सांभाळून स्वयंपाक सांभाळतात त्यांची मेहनत जाणीवपूर्वक कळून येते, त्या खरच ग्रेटच आहेत. प्रश्नच नाही.

Read Full Post »

परवा याच नावाचा एक लेख वाचनात आला. या विषयी माझे काही विचार.
पूर्वी आई-बाबा म्हणतील तिथे मुलींची लग्न व्हायची. एकदम पूर्वी मुलीला तिचा नवरा मांडवातच बघायला मिळायचा. मग पुढे रीतसर बघायच्या कार्यक्रमामध्ये मुलीला मुलगा दिसायचा, पण तेव्हाही मुलीला तिचे मत वगेरे काही विचारले जात नसत. नंतर मग मुला-मुलीला वेगळं बोलायची संधी देवू जावू लागली. मुलीचे विचार जाणून घेवू लागले. पुढे तर मुला-मुलींनाच बाहेर हॉटेल मध्ये भेटायला सांगू लागले, आणि जर एकमेकांना दोघ पसंद असतील तर मग रीतसर कांदापोह्यांचा कार्यक्रम होवू लागला. जमाना अजून पुढे बदलला आणि मग मुलगीच आपला जोडीदार शोधून आई-बाबांना दाखवू लागली. एकूणच काय मुलीना त्यांना हवा तसा जोडीदार पारखायची मुभा मिळाली.
जोडीदार पारखायची मुभा मिळाली, त्याप्रमाणे प्रत्येक मुलीचे आपल्या जोडीदाराविषयी काही pre-defined अपेक्षा असतात. जशी हाताची पाचही बोटेसारखी नसतात, तशा सगळ्या मुलीही सारख्या नसतात. प्रत्येकीच्या मुलाविषयीच्या वेग-वेगळ्या अपेक्षा. पण तरीही काही समान अपेक्षा असतातच सगळ्या मुलींमध्ये. त्यातील ‘वेल सेटलड’ हि एक महत्वाची.
बर प्रत्तेकीच्या ‘वेल सेटलड’ च्या व्याख्याही वेगळ्या. कमी शिकलेल्या रमाला एखादा कारकून मुलगा ‘वेल सेटलड’ वाटतो. ५-७ हजार कमावणाऱ्या शिक्षिका असणाऱ्या ‘जानकी’ला १० एक हजार आणि राहायला भाड्याच्या दोन खोल्या असलेला एखादा ‘वेल सेटलड’ वाटतो. बँकेत नोकरी करून १५-२० एक हजार कमावणाऱ्या अर्चनाला २५-३० हजार कमावणारा आणि भाड्याचा का होईना 1 BHK flat असणार आणि हो आई-बाबा जवळ नसणार (बहिण-भाऊ तर लांबच) म्हणजे ‘वेल सेटलड’. MBA करून finance /HR ची नोकरी करत ३०-३५ हजार कमावणाऱ्या अमृताला मात्र ४०-५० हजार कमावणारा प्लस स्वताचा १ किंवा २ BHK flat असणारा आणि साहजिकच आई-बाबा जवळ नसणारा ‘वेल सेटलड’. तर संगणक अभियंता, ५० हजार कमावणाऱ्या प्राचीला स्वतःचा २ किंवा ३ BHK flat (रो हौसे असेल तर उत्तमच)असणारा ६०-७० हजाराची नोकरी आणि आई -बाबा जवळ नसलेला म्हणजे ‘वेल सेटलड’.
मुलींच्या या ‘वेल सेटलड’ मुलाला शोधता शोहता मात्र त्यांच्या पालकांची चांगलीच दमछाक होते. ते नातेवाईकांकडून, ओळखीन्च्याकडून, वधु-वर सूचक मंडळामधून, net वरून या मुलीना ‘वेल सेटलड’ मुलगा शोधण्याचा अमाप प्रयत्न करतात. काहीना मिळतो, तर काही कम नशिबी ठरतात. मग या मुलींचं होतं काय? काही आपल्या ‘वेल सेटलड’ च्या व्याखेत बदल करून त्यातल्या त्यात एखादा बरा मुलगा बघून शुभ-मंगल सावधान उरकून टाकतात. पण काही मुली मात्र निर्धारी असतात बर का. मिळाला तर ‘वेल सेटलड’च नाहीतर नाही असे म्हणत आपल्या ‘वेल सेटलड’ च्या व्याखेवर ठाम असतात. त्यांच्या मते (किंवा जवळपास सगळ्याच मुलींच्या मते ) लग्न म्हणजे ‘बंधन’, स्वतःच्या स्वातंत्र्यावर निर्बंध वगेरे वगेरे. (तसे पाहायला गेले तर थोडे फार तथ्यही आहे हो त्यात.), मग स्वातंत्र्य घालावायाचेच आहे तर इतर गोष्टी तरी मनासारख्या मिळवाव्यात. (पोइन्त आहे हं.)
पण घराचे काही शांत बसतात होय. दर आठवड्याला एखादा मुलगा पुढे करतातच मुलीपुढे. मग त्यातल्या निर्धारी सरळ ‘नाही’ म्हणतात. मग काही हा सगळा प्रोब्लेमच नको म्हणून higher studies च्या नादाला लागतात. लग्नानंतर नाही जमणार शिक्षण वगेरे अशी उत्तरेही असतात तयार पालकांना द्यायला. 🙂 (पण पुन्हा पोइन्त आहे हं.). काही बऱ्याच स्पस्त वक्त्या असतात. त्या म्हणतात, नाही मिळाला तर नाही, कुठे बिघडले. राहेन मी एकटी (स्वतंत्र). कुणाचे बंधन नाही, कि कुणाची गुलामी. (गुलामी? अहो पण मी तर ‘जोरू का गुलाम’ वगेरे ऐकलं होतं :-)). आणि अशा अनेक सुशिक्षित चांगल्या नोकरी असलेल्या मुली सध्या समाजात आपल्याला दिसतात. पण काहीही म्हणा आयुष्यातएखादा जोडीदार, साथीदार हवाच. आता नाही त्याचे महत्व कदाचित जाणवणार, पण एखाद्या कठीण प्रसंगी किंवा उतार वयात त्याची किती मोलाची साथ ठरते.
हि झाली शिकलेल्या मुलींची गोस्ट. पण शेतकऱ्याच्या मुलींचं काय? अहो म्हणे आजकाल शेतकऱ्याशी लग्नाला कोणी तयारच होत नाही. कितीही चांगल्या घरातला असुदे, भरपूर शेती वगेरे असू दे, पण शेतकऱ्याशी लगनाला मुली तयारच होत नाहीत. एक तर शेती हा पूर्णपणे पाऊस, हवामानावर अवलंबून, सध्या शेतीची अवस्था काही बरी नाही, ठराविक असे उत्पन्न नाही, शेती म्हणजे शक्यतो खेडेगाव वगेरे कारणे मुलीना शेतकऱ्याला ‘वेल सेटलड’ गटापासून लांब ठेवतात.

पैसा, घर, नोकरी हे सगळे महत्वाचेच (पैसा बहोत कूच हे लेकीन सब कूच नही … dialog ऐकलेला कुठे तरी हो :-)) पण या सगळ्यात ‘मुलगा’, त्याचा स्वभाव, त्याचे पालक, त्याचे घराणे, त्यावरचे संस्कार, त्याचे इतरांशी वागणे, त्याच्या आवडी निवडी, त्याच्या ‘काही’ सवयी (compatibility, relationship, chemistry ….. botany, zoology वगेरे वगेरे) याकडे या मुली हवं तेवढंनाही लक्ष देत याचे वाईट वाटते.
शेवटी प्रत्येक मुलीला तिच्या मनासारखा ‘वेल सेटलड’ मुलगा (स्वप्नातला राजकुमार) मिळो हीच ईश्वर चरणी प्राथना. आणि हो प्रत्येक मुलालाही त्याच्या स्वप्नातील राजकुमारी मिळो हीसुद्धा प्राथना हो.

Read Full Post »

लग्नासाठी उभारलेल्या मुलींच्या अनेक अपेक्षा असतात.

मुलगा understanding, down to earth (या दोन गोष्टींचा मला खरच अजून अर्थ नाही कळला) well cultured, well educated, well settled, चांगल्या पगाराची नोकरी असलेला, चांगल्या घरातील, संस्कारी, निर्व्यसनी, स्वतःचा flat असलेला (भले तो पुण्या-मुंबईत का राहत असेना) असावा.

असाच मुलाचा स्वताचा flat असावा या विषयावर माझ्या एका मित्राचा त्याला एका लग्नासाठी आलेल्या मुलीबरोबर झालेला संवाद.

स्थळ : पुण्यातील एक हॉटेल

भेटण्याचे कारण : लग्नासाठी मुला-मुलीची पहिली भेट

(मुला-मुलीचे नाव बदलले आहे :-))

रोहित : हाय

अर्चना : हाय

………. (थोडी फार आवड वगेरे विषयी झाल्यावर)

अर्चना : मला लग्नाआधी तू स्वतःचा २ BHK flat घ्यावास अशी अपेक्षा आहे.

रोहित : (२ सेकंद थांबून) ठीक आहे. मग लग्नानंतर येताना तुही Honda City घेवून ये.

अर्चना : (आशर्यचकित होवून) काय ?

रोहित : अगं हो. लग्नानंतर मी जर तुझ्यासाठी ३० लाखाचा flat घेणार असेल तर तुला कमीत कमी ७-८ लाखाची Honda City नको आणायला माझ्यासाठी.

अर्चना : अरे पण ….

रोहित : मला सांग. तुम्ही कधी घेतला स्वताचा flat?

अर्चना : ४ वर्ष झाली.

रोहित : बर म्हणजे तुझ्या वडलांनी वयाच्या चाळीशी नंतर स्वताच घर घेतलं आणि तू तुझ्या होणार्या नवर्याकडून पंचविशीत स्वताच्या घराची अपेक्षा ठेवतेस?

अर्चना : hmmmmmm I mean

रोहित : अगं हो मानलं काही मुलं घेतात लग्नाआधी स्वताच घर (घरच्यांचं तसं आर्थिक पाठबळ असतं त्यांना), म्हणून काय सगळ्यांकडूनच ठेवायची हि अपेक्षा?

अर्चना : actually आईनेच सांगितलं होतंअसा विचारायला.

………………………..

 

असं होतं बघा. नक्की मुलीच्या अपेक्षा कोणत्या आणि तिच्या आईच्या (घरचांच्या) कोणत्या, हेच समजणं अवघड आहे.

पण मुलाचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी, त्यावरचे संस्कार, इतरांशी त्याची वागणूक वगेरे या महत्वाच्या गोष्टींकडे मुली किती सहजपणे काना-डोळा करतात आणि घर, नोकरी, पैसा वगेरे गोष्टीना अधिक महत्व देतात. याचा अर्थ त्या महत्वाच्या नाहीत असे नाही, पण ज्यावर तुमचा पुढचा संसार उभा असणार आहे त्याकडे जास्ती महत्व द्यावे.

Read Full Post »

२-४ आठवड्यापूर्वी ‘Start Plus’ वर ‘Lux Perfect Bride’ नावाचा एक कार्यक्रम चालू झाला. सुरवातीला कार्याक्रामध्ये १० मुली आणि ५ मुले सहभागी झाले. ५ मुलांबरोबर त्यांच्या आईहि होत्या. त्यांना एकाच मोठ्या घरामध्ये (महालामध्ये) ठेवण्यात आले. पण मुलांसाठी एक वेगळा विभाग (कुवर महाल) आणि मुली आणि मुलांच्या आई यांच्यासाठी वेगळा विभाग (Mummy महाल) करण्यात आला. दोन्ही group ला हे विभाग ओलांडायची परवानगी नव्हती. फ़क़्त जेव्हा कार्यक्रमवाल्यांकडून संदेश येईल तेव्हा कोणा एकाला किंवा group ला वगेरे दुसर्या विभाग (महाल) मध्ये  जाण्याची परवानगी मिळे.
दोन्ही विभागात अनेक कॅमेरे आहेत, तसेच प्रत्येकाकडे माईक आहे, त्यामुळे सगळ्यांच्या हालचाली, आणि बोलणे लगेच कळते.

मग ज्या कार्यासाठी कार्यक्रम होता, त्यानुसार ज्या मुलांना आणि मुलीना एकमेकात interest होता त्यानुसार त्यांच्या गाठी-भेटी, इशारे वगेरे होवू लागल्या. प्रत्तेकजण एकमेकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होते. एक-मेकांच्या विभागामध्ये जायला सवलत नव्हती म्हणून गेटवर येवून (दोन्ही विभाग जोडणारे गेट), किंवा  गच्चीवर येवून मुले-मुली एकमेकाशी बोलत होते. एक-मेकांना बोलवायच्या पण प्रतेक्काच्या वेगळ्या पद्धती होत्या. काहीजण चित्र-विचित्र आवाज करून आपल्या आवडत्या व्यक्तीला बोलावत होते, तर कोणी सांकेतिक खुणा करून बोलावत होते, तर कोणी ठरवलेली गाणी म्हणून.
मुली आणि मुलांच्या आई एकत्र होत्या त्यामुळे मुली आईना गोड बोलून, काम करून (काम करते असे दाखवून), जेवण बनवून इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होत्या. आई देखील आपल्या मुलासाठी कोणती मुलगी योग्य हे पाहत होत्या, आणि तसे सल्लेही आपल्या मुलाला देत होत्या.
प्रत्येक आठवड्यात मुलांना काही टास्क(कार्य) दिले जायचे, आणि जो जिंकेन त्याला आपल्या आवडत्या मुलीबरोबर बाहेर ‘date’ वर जाण्याची सवलत दिली जायची. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांच्या SMS नुसार ‘Bride Of the Week’ आणि ‘Mummy Of the Week’ निवडली जाई. ‘Mummy Of the Week’ mummy महालाची त्या आठवड्यासाठी प्रमुख बनत असे.
प्रत्येक आठवड्यातून एका मुलीची ‘बिदायी’ होते. ‘Mummy Of the Week’ सगळ्या मुलीमधून एका मुलीला कार्यकममधून बाहेर काढते (बिदा करते). तेव्हा थोडी राडा-रड पण होते.
मागील आठवड्यापासून ‘Bride Of the Week’ ला एका मुलाला कार्यक्रमामधून बाहेर काढायची संधी दिली गेली होती. म्हणजे आता एका आठवड्यात मुलगी जाईल, आणि दुसर्या आठवड्यात मुलगा जाईल.

मुले आणि मुली वेगवेगळ्या profession ची आहेत, २० ते ३० च्या वयातील आहेत. चांगल्या घरातील आहेत.

वेग-वेगळे टास्क्स, लहान सहान भांडणे, हसी -मजाक, रडगाणे, politics वगेरे म्हणजे थोडक्यात typical reality show असल्याने interesting show वाटतो.
आता मी ‘यंदा कर्तव्य आहे’ असे घोषित केलेलं असल्यामुळे मला तरी interesting वाटतो. 🙂

मला या कार्यक्रमात आवडणाऱ्या दोन मुली म्हणजे : ‘गुरप्रीत’ आणि ‘नंदिता’.

आपण हा कायक्रम पाहत असाल तर आपल्या आवडणाऱ्या मुली/मुले यांची नावे शेअर करावीत.
तसेच काही comments असतील तर तेहि शेअर करावीत.

Read Full Post »

काहीच दिवसात मला लग्नासाठी मुलगी पहायच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे. 🙂
जेव्हा मुलीबरोबर एकटे बोलण्याची संधी मिळेल तेव्हा तिला समजुन घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत किंवा कोणते विषय तिच्याशी discuss करावेत, कोणत्या गोष्टीवर तिचे विचार समजुन घ्यावेत या विषयी सध्या मी विचार करत आहे.

मी एक संगणक अभियंता आहे, लग्नासाठी एक नोकरी करणारी मुलगी शोधत आहे, आणि पुढे लग्नानंतर पुणे या ठिकाणी होणार्या पत्नी समवेत राहीन, आशा वेळेस होणार्या पत्नीला जानूंन घेण्यासाठी कोणते प्रश् विचारावेत, कोणते विचार समजुन घ्यावेत या विषयी आपण काही tips वेवु शकाल तर आभारी असेल.

प्रश्न for example,

1) तुज्या आवडी, hobbies?
2) लग्ना नंतर joint family prefer करशील का एकटा नवर्या बरोबर(च) रहायला आवडेल?
3) (पुन्यासार्ख्या ठिकाणी) मुलाकडून स्वताच्या घराची अपेक्षा आहे की सुरवातीला काही दिवस (वर्ष) भाड्याच्या घरी रहायला आवडेल?

असे काही प्रश्न समजले तर नक्कीच मला त्याचा फायदा होईल.

आभारी आहे.

लग्नासाठी उभा असलेला एक ….

Read Full Post »

खरच अस वाटत कधी कधी. पहा ना एका अनोळख्या मुलीबरोबर तुम्ही आयुष्भर एकत्र राहणार, तुमची secrets (बँक balance सुद्धा) शेअर करणार…. पण तीचाशी लग्न करण्यापूर्वी खरच तुम्हाला ती पूर्णपणे माहित असते का हो? हा इथे love marriage वाले थोडे नशिबी ठरतील. पण arrange marriage वाल्यांच काय?

अहो तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून, ओळखीच्नाकडून, वधूवर सूचक मंडळातून (किंवा इकडून-तिकडून कुठून तरी) मुलीचं स्थळ येते. बरोबर एक identity size photo (आपण नशिबी असाल तर post कार्ड size मधला) असतो. आणि एक कुंडली. तुम्ही आपल्या गुरुजींकडून गुण जुळवून पाहता. जे थोडे चीखीत्सक आहेत ते एक नाड वगेरे वगेरे म्हणजे जरा खोलात जाऊन पाहतात. आणि या सगळ्यातून जर का कुंडली जमली तर, तुम्ही मुलीकडील लोकांना  मुली पाहायला येत आहोत म्हणून कळवता. (आता कुंडली पाहणार्यांना खरच त्यावर १००% विश्वास असतो का हा एक प्रश्नच  आहे, कारण कुंडली पाहूनही मग अनेक लोक काही ना काही कारणाने मुलगी नाकारतात. मग जर का मुलगी नंतर कोणत्यातरी कारणाने नाकारायची आहे तर मग कुंडलीच नाटक कशाला).

मग मुलगी पाहायचा (कांदे पोहे) कार्यक्रम ठरतो. मुलगा आपल्या आई-वडील आणि २-४ वयस्कर स्त्री-पुरुष मंडळीच्या बरोबर (झाल्यास एखाद्या मित्राबरोबर) मुलींकडे येतो. आधी इकडच्या-तिकडच्या गप्पा होतात. मग ज्यासाठी मुलगा आतुर असतो ती घटिका येते. मुलगी चहाचा किवा कांद्या पोह्यांचा ट्रे घेवून येते. मुलगा मुलीकडे (डोळे फाडून) बघतो. मुलगी आपली सगळ्यांना चहा/कांदे पोहे देत जेव्हा मुलाची पाळी येते तेव्हा त्याकडे हळूच चहा/पोहे देताना पाहते. मग मुलगी आत जाते. आत तिला आई, बहिणी, मात्रिणी “कसा आहे गं – कसा आहे गं” वगेरे वगेरे विचारतात. पोहे-चहा फस्त केल्यावर मुलाचे वडील मुलीला पुन्हा बाहेर आण्यासाठी मुलीच्या वडिलांना सांगतात. मुलगी पुन्हा बाहेर येते. एका खुर्चीवर बसते. मग मुलाचे वडील किंवा इतर प्रौढ पुरुष मंडळी प्रश्न विचारायला सुरवात करतात. “नाव काय मुली?” (आता ज्या मुळीच नाव पण माहित नाही त्या मुलीला लग्नासाठी पाहायला कोण येईल का?… पण असे प्रश्न प्रश्न विचाराने कोणाकडूनही अपेक्षित नसते… मुलीकडून तर नाहीच नाही :-)),
मुलगी : “संगीता, वारेगे काहीतरी”
मग स्वयंपाक, शिवणकाम, गाणी म्हणणे येते का वगेरे प्रश्न विचारले जातात. मधेच मुलीचे आई-वडील मुलीने केलेले शिवणकाम, भरतकाम वगेरे दाखवतात.

मुलालाही त्याला काही प्रश्न विचारायायाचे असल्यास विचार असे सांगितले जाते. Normally मुले (चार-चौघात) काही प्रश्न  विचारात नाहीत. “तुम्हीच विचार” म्हणतात. अशा वेळेस “अरे लेका लग्न काय बाकीचे करणार आहेत का तू?” असा प्रश्न नक्कीच मुलीच्या मनात येत असेल. त्यात्ल्यातात एखादा धीट असेल तर, “तुमची आवड, hobbies” वगेरे विचारतो.

मग जरा शिकले सवरलेले (forward) लोक असतील तर, त्यातला एखादा, “मुला मुलीला काही बोलायचे असल्यास बोलुदे एकांतात. उगाच आपल्या मोठ्यांमध्ये ऑकवर्ड  होत असेल त्यांना. शेवटी लग्न त्या दोघांनाच करायचे आहे ना… हा हा हा”.

मग त्या दोघांना एखाद्या खोलीत, अथवा apartment असेल तर टेरेसवर थोडा वेळ एकटे बोलण्याची मुभा दिली जाते. मग पहिले १-२ मिनिट पेहेले आप -पेहेले आप करण्यातच जातात. मग शेवटी कोणी तरी पुढाकार करून सुरवात करते (normally मुलंच).

मुलगा : “तुमच्या hobbies काय?”
मुलगी : “वाचन, गाणी ऐकणे, tv पाहणे”
मुलगा : “छान. recently कोणते पुस्तक वाचले?”
मुलगी: “umm… ahhhh… (असेच २-४ सेकंद करून) फार दिवस कोणते पुस्तकच नाही वाचले. (यातून काय समजायचे ते समजून घ्यावे).
मुलगा : ok. लग्ना नंतर joint family आवडेल कि एकटे.
मुलगी : joint family (मनात एकटे)

म्हणजे जी काय १५-२० मिनिटे असतात, त्यात फ़क़्त एकमेकांची वरवरची माहिती मिळते.
तेवढ्यात कोणी तरी बाहेरून विचारते, “hmmmm… झाले का बोलणे?” (आता कोणता मुलगा मुलगी, “अहो कुठे? आत्ता तर सुरवात झाली आहे, अजून अर्धा एक तास लागेल” असे म्हणेल.). मुलगा आपला, “हो हो झालेच” म्हणत बाहेर येतो.

आणि अशा प्रकारे कांद्या पोह्याचा कार्यक्रम संपवून नंतर कळवतो म्हणून मुलाकडचे तिथून निघतात.

घरी त्यांची बोलणी होतात. मुलगी पसंद असेल तर पुन्हा एकदा मुलाच्या बहिणी, काका-काकू वगेरे लोक पुन्हा एकदा मुलगी पाहायला जातात. तेव्हा शक्य असल्यास पुन्हा एकदा मुला-मुलीला बोलायची संधी मिळते.

आणि सगळे काही (मान-पान, देण्या घेण्याची बोलणी) व्यावास्तित्त पार पडली तर दोघांचे लग्न ठरते.

वरील प्रसंगातील मुलगा – मुलगी (आणि त्यांचे घरातले) शिकलेले (शुशिक्षित) असतील तर मुला-मुलीला बाहेर (हॉटेलमध्ये) एकटे भेटायला chance मिळतो. पण हा chance एकदाच…. जास्तीत जास्त दोनदा. आणि तुम्हाला आपला काय तो निर्णय सांगावा लागतो.

पण शेवटी असा प्रश्न पडतो कि, खरच एक-दोन भेटीत तुम्ही तुमचा life partner पर्खू शकता? after all जिच्याबरोबर तुम्ही तुमचे उरलेले आयुष्य पार पाडणार आहे, एकाच घरात (आणि bedroom मध्येहि) राहणार आहे, सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे, ती जोडीदार पारखायला इतकासा वेळ पुरेसा आहे का?

आता अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी पूर्वीच्या लग्नांची वगेरे उदाहरणे दिली जातील. पण पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वी मुलीना काहीच choice वा सवलत नसायची.एक प्रकारच्या धाकातच असायच्या त्या. पण आता तसे नाही, आताच्या मुली स्वतः कमावत्या आहेत, स्वताच्या पायावर उभ्या आहेत.

मग खरच arrange marriage ठरवताना दोघांना एक-मेकांना जाणून घेण्यासाठी दिला गेलेला इतका(सा) वेळ पुरेसा आहे का?

Read Full Post »