महाराष्ट्राचे दोघेहे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज. आज मात्र एकमेकांपुढे उभे आहेत.
खरे पाहत वादाचे काही कारणही नाही. कदाचित मुंबई भारताची, आणि त्यावर कोण्या एकाचा हक्क नाही असे काहीतरी सचिनने बोलण्याने बालासाहेबाना खटकले असावे. आता हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा तो मुद्दाम वाद उठाव्ण्यासाठीच, हे सचिनला कळले नसावे का? एवढा ‘आपला’ सचिन तेव्हा ‘no comments’, मला यावर भाष्य नाही करायचे वगेरे म्हणून शांत बसलाही असता, after all ती press conference सचिनच्या कार्कीद्दीला २० वर्षे पूर्ण झाल्याची होती, मग तिथे मुंबई कुणाची हा प्रश्नच उपस्तीत करायचे काय कारण?
दुसरीकडे बाळासाहेब यांना तरी लगेच यावर इतके तिखट भाष्य करायची काय गरज होती. त्यांचे तंतोतंत नाही पण थोडे फार पटते.
ज्या मुंबईला मिळवण्यासाठी१०० हून अधिक लोकांनी प्राणाची आहुती दिली ती काय यासाठी कि उद्या याच महाराष्ट्राचा एक कोहिनूर हिरा मुंबई हि भारताची वगेरे म्हणेल. अहो मुंबई हि भारताचीच आहे हो, कोण नाही म्हंटले आहे, पण ते कुणी, कुठे, कोणाला, कसे विचारले आहे, हे पण पाहायला हवे.
आणि या सगळ्या हिंदी आणि इंग्लिश news channel वाल्यांना विचारावेसे वाटते, मुंबई हि तेव्हाही भारताचीच होती, मग कशासाठी त्या सगळ्या लोकांनी प्राणाची आहुती दिली?
अहो मुंबई तेव्हाही भारताचीच होती, आजही आहे आणि उद्याही राहीनच, पण ती महाराष्ट्राला मिळावी म्हणून त्या सगळ्या लोकांनी प्राणाची आहुती दिली ना.
वाईट फक्त इतकेच वाटते कि, इतिहास पुन्हा गिरवला जातोय. दोन मराठी मानस भांडताहेत आणि बाकीचे मजा बघताहेत.
Read Full Post »